असंघटीत क्षेत्रात काम करणा-या विविध प्रकारच्या कामगारांना योजनेचा फायदा
असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या विविध प्रकारच्या कामगारांना वयाच्या ६० वर्षा नंतर ३,०००/- रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेशी जोडू इच्छिणाऱ्या कामगाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त असू नये.
केंद्र सरकारच्या याआधीच्या पेंशन योजनांचा लाभ घेणाऱ्या सदस्य असणाऱ्या कामगार मानधन योजनेसाठी पात्र ठरवले जाणार नाही. रिक्षा चालक, निर्माण कार्य करणारे मजदूर, कचरा वेचक, बीडी बनवणारे, कृषी कामगार, मोची, धोबी, चांभार अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या असंघटीत क्षेत्रातील कामगारांना याचा लाभ होणार आहे
योजनेशी जोडल्या गेलेल्या १८ वर्षाच्या कामगाराने ५५/- रु मासिक शुल्क जमा करणे गरजेचे आहे. इतकीच रक्कम सरकार देखील भरणार आहे.तर ४० वर्षाच्या व्यक्तीला २००/- रुपये प्रति महिना हफ्ता द्यावा लागणार आहे. यासाठी योजनेसाठी किती पैसे गुंतवावे लागतील,हे तुमच्या वयाप्रमाणेठरेल. ६० वर्षे होईपर्यंत ही रक्कम भरावी लागणार आहे.
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा कर्मचारी भविष्य निधी ( EPFO ), नॅशनल पेन्शन स्किम ( NPS ) किंवा राज्य विमा निगम ( ESIC ) चे सभासद किंवा इन्कम टॅक्स भरणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत.
अर्ज कसा करावा.-
आपल्या जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये आधार क्रमांक आणि सेव्हिंग्ज बँक खाते / जन धन खात्याला स्वप्रमाणीत करून PM-SYM साठी नोंदणी
फायदे -
१) ६० वर्षे पूर्ण केल्यावर रु.३,०००/- प्रति महिना पेन्शन.
२) पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ती रक्कम त्याच्या जोडीदाराला.
३) कोणताही कामगार नियमित हफ्ता भरत असेल आणि कोणत्या तरी कारणाने त्याचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी किंवा पती ही योजना पुढे चालवू शकतात.
४) कामगाराच्या मृत्यूनंतर जर संबंधितांना योजना बंद करायची असेल तर तेव्हा पर्यंत भरलेली पूर्ण रक्कम व्याजासहित मिळणार आहे.