केंद्र सरकार भरणार २ वर्षांपर्यंत PF


केंद्र सरकारने कोरोना काळात सामान्यांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atma Nirbhar Bharat Rojgar Scheme) सुरू केली आहे. कर्मचार्‍यांना आणि रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. ही योजना १ ऑक्टोबर २०२० रोजी लागू झाल्याचे मानले जाईल आणि ही योजना ३० जून २०२१ पर्यंत राहील. 

महिना १५,०००/- पेक्षा कमी पगारावर असणाऱ्या नव्या नोकरदारांना त्याचप्रमाणे नव्याने नोकरी लागलेल्यांना या योजनेचा फायदा मिळेल. तसेच कोरोना काळात म्हणजे १ मार्च ते ३० सप्टेंबर काळात जुनी नोकरी गमावली आणि नव्याने १ ऑक्टोबर किंवा त्यानंतर नोकरी लागलेले सगळे नोकरदार समाविष्ट आहेत. या संबंधित कर्मचाऱ्यांच्या PF ची संपूर्ण २४% भागीदारी २ वर्षासाठी सरकार देईल.

१००० पेक्षा कमी लोकांना रोजगार देणाऱ्या संस्थांमध्ये पीएफचे १२% टक्के Employee's contribution आणि १२% टक्के employer's contribution असं २४% टक्के अनुदान सरकारतर्फे देण्यात येईल.

१००० पेक्षा अधिक नोकरदार असलेल्या कंपन्यांना Employee's contribution चा १२% टक्के भाग सरकार देणार आहे. ६५ टक्के संस्था यामध्ये समावेश केला जात आहे.