चौगुले इंडस्ट्रिज मधील कामगारांना कधी मिळणार न्याय

पुणे : चौगुले इंडस्ट्रिज प्रा.लि.या मारूती कंपनी अधिकृत सर्व्हिस डिलर्स येथील कामगार यांच्या वरती होणाऱ्या अन्यायाबाबत कामगार संघटना सतत आवाज उठवत आहेत. तसेच सनदशीर मार्गाने आंदोलन, निषेध मोर्चे काढून देखील शासनाकडून देखील याची दखल घेतली जात नाही असे चित्र आहे.

काय आहे प्रकरण 

         चौगुले इंडस्ट्रिज कामगार संघटना यांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवस्थपणाने कामगार यांना असणारे कार्यदेशीर पगार तसेच हक्क मिळू दिले नाही याकरिता संघटना प्रयत्न करत असताना सन २०१३, २०१५ हया कालावधीमध्ये कामगारांना व कामगार प्रतिनिधी यांना कामावरून काढुन टाकले. 

        त्यानंतर सन २०१९ मध्ये ३० कामगारांना कामावरून काढले. त्यादरम्यान सर्व काढलेल्या कामगारांना कामावर घेण्याकरीता संघटने मार्फत ठिय्या आंदोलन, मुकनिषेध, अर्धनग्न आंदोलन याप्रकारे सतत १६५ दिवस आंदोलन केले.

        दि. ५ फेब्रुवारी २०१९ रोजी कामगार राज्यमंत्री बच्चु कडु यांनी मालक व संघटना व कामगार उपआयुक्त यांची आढावा मिटींग मध्ये कंपनी व्यवस्थापनेला सर्व कामगारांना कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर हि कंपनीने विलंब केला त्यादरम्यान कोरोना परीस्थिती व लाॅकडाऊनचा फायदा घेऊन आज पर्यंत कामगारांना कामावरती घेतलेले नाही.

कामगार संघटना हयांची मागणी

सर्व संबंधित कामगार यांना कायदेशीर हक्क मिळावे तसेच कामावरती घेतले जावे.

कामगार संघटने मार्फत सतत लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री यांच्या कडे न्याय मिळावा म्हणून मागणी करत आहेत यावरती शासन काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे.