दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मंगळवारी ८ डिसेंबरला भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्या बंदला इंटक, आयटक, एचएमएस, सिटू, एआययूटीयूसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ आणि यूटीयूसी या कामगार संघटना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत.
बँका, एअरपोर्ट, संरक्षण खात्यातील केंद्रिय संस्थांचे खाजगीकरण करुन आता अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असणा-या शेतकरी आणि कामगारांचे अस्तित्वच या शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांमुळे संपुष्टात येणार आहे. भांडवलदारांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था एकवटली जाईल. हे भांडवलदार सर्व सामान्य नागरीकांचे शोषण करतील. भांडवलदारांना पाठबळ देणा-या केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे.
या बंद ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पाठिंबा दिला असून यांच्या संलग्न कामगार संघटना, कामगार संघटना कृती समिती, कामगार-कर्मचारी संघर्ष युनियन यांनी देखील बंदला पाठिंबा दिला आहे.