पेपर मिल प्रबंधन व कामगार युनियन यांच्या मध्ये त्रिवार्षिक करारनामा

बल्लारपूर : पेपर मिल प्रबंधन व कामगार युनियन यांच्यात बैठक होऊन कामगाराच्या हिताकरीता त्रिवार्षिक करारनामा करण्यात आले.

        या त्रिवार्षिक करारनामा बाबत युनियन चे अध्यक्ष तथा माजी खासदार  नरेशबाबु पुगलिया व प्रबंधन चे सी.ओ.ओ.  निहार अग्रवाल, एच.आर. प्रमुख रणजी अब्राहम, युनिट हेड उदय कुकडे, जी.एम. एच. आर  प्रवीण शंकर,डि.जी.एम. एच. आर. अजय दुरागकर,  महासचिव वसंतराव मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग कलसी, रामदास वाग्दरकर, सी. के. नायर, विरेंद्र आर्या, सुभाष माथनकर, अनील तुंगीडवार, गजानन दिवसे, सुदर्शन पुली,आशिष मोहता, के. व्हि. रेड्डी, राजेन्द्र शुक्ला, यांच्या उपस्थितीत चर्चा संपन्न झाली ते वृत्त विदर्भ न्यूज एक्स्प्रेस वृत्तसंस्थेने दिले आहे.

     यात स्थायी कर्मचाऱ्यांना ४८०१/- (चार हजार आठशे) व कंत्राटी कामगारांना दर दिवशी ६२.५० /- प्रथम वर्षात व दुसऱ्या वर्षापासून ६५/- रुपये दररोज प्रमाणे वाढ होईल . तसेच १०/- रुपये कुशल कामगारांना पहिल्या वर्षापासून भत्ता अतिरिक्त मिळेल.