फलटण : केंद्र सरकारने प्रचलित कायदे रद्द करून चार नव्या कायद्याना संसदेमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मालक धार्जिनी कायद्याला मंजुरी दिली,आणि इंधन दरवाढ, गॅस दरवाढ या महागाई मुळे कामगारांचे अतोनात हाल होत आहेत. याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याने केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासठी संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने फलटण तहसील कार्यालया वर धडक मोर्चाचे २९ मार्च रोजी दुपारी आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चा मध्ये महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना, सीआयटीयु, फलटण बांधकाम कामगार संघटना तसेच इतर स्थानिक संघटनांचे घरेलू कामगार व बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चा मध्ये आय्याज आतार सीआयटीयू, राजकुमार सुतार, नंद कुमार जगताप, रवींद्र गुप्ते महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना, शांताराम कारंडे फलटण बांधकाम कामगार संघटना, भाऊसाहेब बनकर, विकास मोरे, अमित गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली.
संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांना कामगारांच्य मागण्यांचे निवेदन दिले. यानंतर मोर्चाचा समारोप मीनाताई पंडित प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना यांनी आपल्या भाषणात वाढलेल्या महागाई मुळे असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे अतोनात हाल होत असून कामगारांचा पगार वाढत नाही परंतु महागाई वाढत आहे त्यामुळे घर चालवणे अवघड झाले आहे, केंद्र सरकारने वाढत्या महागाईला आळा घालावा असंघटीत कामगारांना गॅस सिलेंडर निम्या किमतीत द्यावा असे आवाहन केले. धनराज कांबळे प्रदेश अध्यक्ष नागरिक सुविधा परिषद यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. शरद पंडित प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटना यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धरणामुळे देशातील कामगार देशोधडीला लागनार असून बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे. या मालक धार्जीनी धोरणाचा निषेध करण्यासाठी व वाढत्या महागाईला विरोध करण्यासाठी कामगारांनी पुढील काळात रस्त्यावर येऊन लढा द्यावा लागेल त्यासाठी सर्वांनी संयुक्त कामगार कृती समितीला सहकार्य करावे असे आवाहन केले.