मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारने वाढ केल्यानंतर आता राज्य सरकारनेही त्याचे अनुकरण केले आहे. आता तीन टक्के अधिक महागाई भत्ता राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
1 जुलै, 2021 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 28 टक्क्यांवरुन तो 31 टक्क्यांवर नेला आहे. राज्य शासकीय कर्मचारी, इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली असून तीन टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महागाई भत्ता वाढ 1 जुलै, 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च, 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. तसेच महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी आणि कार्यपध्दती आहेत त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
थकबाकी मिळण्याचा मार्गही मोकळा
राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 1 जुलै 2021 पासून 11 टक्के वाढ देऊन महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला होता. ऑक्टोबरपासून ही वाढ देण्यात आली. जुलै ते सप्टेंबर 2021 पर्यंतची तीन महिन्यांची थकबाकी प्रलंबित ठेवण्यात आली होती. ती थकबाकी चालू महिन्याच्या वेतनात रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, वित्त विभागाने बुधवारी तसा स्वतंत्र शासन आदेश काढला. तसेच आताच्या तीन टक्के वाढीची जुलैपासूनची थकबाकीही रोखीने मार्चच्या वेतनात देण्यात येणार आहे.
संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा 👇