कोल्हापूर : कामगार, शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक आणि लक्षवेधी आंदोलनातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि न्याय मिळवून देणारे कोल्हापूरचे कामगार, शेतकरी नेते संजय दिनकराव पाटील यांची राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या किसान ब्रिगेड या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय प्रवक्ते पदी नुकतीच निवड झाली त्यांची नियुक्ती राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश काकडे यांनी केली.
कामगार नेते संजय पाटील किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून सुद्धा काम पहात आहेत .प्रवक्ते म्हणून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील किसान ब्रिगेड ची भूमिका, प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे आणि बेरोजगारांच्या प्रश्नाबाबत चे धोरण .आंदोलन दिशा इत्यादी मांडणार आहेत. तसेच प्रसारमाध्यमांना ते सामोरे जाणार आहेत .
शेतकऱ्यांच्या,कामगारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आजपर्यंत शेकडो आंदोलने केली आहेत व यशस्वीही केली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे यशस्वी आंदोलक म्हणून त्यांची भविष्यात नोंद होईल अशी प्रतिक्रीया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.