कोल्हापूर : कामगार नेते, शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेली वीस वर्षे सातत्याने शेकडो आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेणारे आंदोलक संजय पाटील यांची किसान ब्रिगेड या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तसेच दैनिक देशोन्नती चे मालक व संपादक श्री प्रकाश पोहरे आणि कार्याध्यक्ष अविनाश काकडे यांनी केली.
प्रकाश पोहरे यांनी शरद जोशी यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन करताना अनेक गुन्हे स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत .संजय पाटील यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदा बरोबर कर्नाटक आणि गोवा या राज्यांची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. किसान ब्रिगेड चे मुख्य उद्देश विष मुक्त शेती असून सेंद्रिय शेती ला प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे असे असून शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या बेरोजगार मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेची प्रमुख भूमिका असेल. नुकतेच किसान ब्रिगेडने किसान विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी पंधरा दिवसांची सायकल यात्रा काढली होती.
कामगार कर्मचारी संघर्ष युनियन च्या माध्यमातून संजय पाटील यांनी सर्व प्रकारच्या संघटित, असंघटित कामगार, कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्याचे काम ते करत असून कामगार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संजय पाटील यांनी संघटन बांधले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.