महिंद्रा लॉजिस्टिक कामगारांच्या विषयी शुक्रवारी बैठक

चाकण : चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा लॉजिस्टिकच्या कामगारांनी सोमवारी  (दि. १५ मार्च ) सकाळी सात वाजले पासून विविध प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तरी (दि.१५ मार्च) संध्याकाळी कामगारांनी याबाबत मावळ चे आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन होणाऱ्या कंपनी अत्याचाराबाबत माहिती दिली यावरती आमदार सुनील शेळके यांनी कामगार व कंपनी व्यवस्थापन यांची शुक्रवारी बैठक लावली अशी माहिती कामगार प्रतिनिधी यांनी दिली आहे.

     महिंद्रा लॉजिस्टिक मध्ये २०५ कामगार मागील १० ते १२ वर्षांपासून काम करत असून कंपनी व्यवस्थापनाच्या आडमुठ्या आणि एकतर्फी निर्णयामुळे कामगारांना येथे काम करणे अशक्य झाल्याचे कामगार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. याबाबत लवकर तोडगा निघावा अशी भावना कामगार प्रतिनिधी यांनी व्यक्त केली.