सुरक्षा रक्षक यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात - आमदार दादाराव केचे

महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक यांच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी मागणी आर्वी विधानसभा आमदार दादाराव केचे यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली अशी माहिती सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ चे भतर जयसिंगपूरे यांनी दिली. सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ यांनी सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्या तसेच प्रश्न आर्वी विधानसभा आमदार दादाराव केचे यांच्या कडे मांडल्या तसेच त्याबाबत निवेदन दिले होते.

यामध्ये प्रामुख्याने : 

  • महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळ अंतर्गत सुरक्षा रक्षक यांना वेतनासह रजा एक वर्षांमध्ये चार टक्के तरतूद असून ती वाढवून दहा टक्के रजा देण्यात यावी.

  • खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम १९८१ अन्वये बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नोंदणीकृत सुरक्षारक्षकांना १९९३-९४ या वर्षापासून १०% दराने सानुग्रह बोनस देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सुरक्षारक्षकांना १०% दराने बोनस दिला जावा.

  • सन २००८ मध्ये केंद्र शासनाने पारित केलेल्या असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम अंतर्गत ९ प्रकारच्या सामाजिक सुरक्षा योजना असंघटित कामगार साठी लागू करण्यात आल्या आहेत यामध्ये जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य आणि प्रसूति लाभ योजना, निवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह योजना, कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना, गृह निर्माण योजना, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, अंत्यविधी अर्थसहाय्य योजना, वृद्धाश्रय योजना या सर्व योजना महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक मंडळ यांनी देखील राबविणे.