मुंबई : कंपन्यांकडून कामगारांना कामावरून कमी केलं जात आहे. कामगारांना कामावरून कमी करू नये असे मनोगत आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान व्यक्त केले.
मावळ-खेड-शिरूर या तालुक्यांमध्ये औद्योगिक हब आहेत. त्यातून तरुणांना रोजगार मिळायला हवा ही आमची मागणी आहे. या भागातील अनेक कंपन्यांकडून कामगारांना कामावरून कमी केलं जात आहे. कामगारांना कामावरून कमी करू नये अशी विनंती केली असता कंपन्या केंद्र सरकारचा जीआर दाखवतात. यातून तरुणांना देशोधडीला लावण्याचे काम कंपन्यांनी केले असल्याचा आरोप शेळके यांनी केला. या भागात केवळ स्थानिक भूमीपुत्र नसून राज्यातील अनेक भागातून तरुण येथे आले आहेत. मावळ तालुक्यातील मावळ्यांच्या नादी कोणी लागू नका, त्यांचा उद्रेक होऊ देऊ नका, असे ते म्हणाले.