राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१८ मध्ये १४९, सन २०१९ मध्ये १०३ आणि सन २०२० मध्ये ७२ अशा एकूण ३२४ कंपन्यांनी या तीन वर्षांच्या कालावधीत दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
अधिक माहिती देताना ते म्हणाले, एनसीएलटीने दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१८ मध्ये ८,३३० अर्ज, सन २०१९ मध्ये १२,०९१ आणि सन २०२० मध्ये ५,२८२ अर्ज आयबीसी अंतर्गत दाखल करण्यात आले होते.