कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्यावर दिवाळखोर कंपन्यांची संख्या

Bankrupt Companies after lockdown was imposed due to COVID-19 pandemic.

भारतीय दिवाळखोरी व नादारी मंडळाच्या (आयबीबीआय) माहितीनुसार, कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्यावर ०१.०४.२०२० ते ३१.१२.२०२० या कालावधीत देशातील दिवाळखोर म्हणून जाहीर झालेल्या कंपन्यांचा  तपशील खालीलप्रमाणे आहे. :

i. कंपनी दिवाळखोरी ठराव (CIRP) प्रक्रियेअंतर्गत २८३ कंपन्यांचा अंतर्भाव

ii. ७६ कंपन्यांचा कंपनी दिवाळखोरी ठराव (CIRP) प्रक्रियेअंतर्गत निपटारा झाला तर १२८ कंपन्यांची प्रकरणे अर्ज मागे घेतल्यामुळे किंवा तडजोडीमुळे निकाली निघाली तर दिवाळखोरी ठरावांद्वारे १८९ कंपन्या बंद करण्यात आल्या

iii. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० अन्वये दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत तडजोड/ वाटाघाटी किंवा व्यवस्थेनुसार ३० कंपन्यांचे विघटन / विक्री करण्यात आली तर ५९ कंपन्या स्वतःहून दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत बंद करण्यात आल्या.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात ही माहिती दिली.