कामगार वाचवा-शेतकरी वाचवा निमित्त पुणे ते मुंबई कामगारांची सायकल रॅली

पुणे : शेतकऱ्यांच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारने नवीन शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द करावे म्हणून दि.२४ जानेवारी २०२१ पासून दि.२६ जानेवारी २०२१ पर्यंत आझाद मैदान-राजभवन मुंबई या ठिकाणी तीन दिवसीय धरणे आंदोलन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध संघटना मिळून सायकल रॅलीच आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समिती, पुणे जिल्हा व जनआंदोलन संघर्ष समिती,पुणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

      कंत्राटी कामगार प्रथा रद्द करा, कामगार विरोधी नवीन कामगार कायदे रद्द करा, जनता विरोधी शेती कायदे रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या, शेतकरी वाचवा, देश वाचवा या व विविध मागण्यासाठी रॅली चे आयोजन करण्यात आले असून रॅली ची सुरुवात दि.२० जानेवारी २०२१ यवत, कुरकुंभ पासून होऊन टप्या टप्यामध्ये रांजणगाव, शिक्रापूर, चाकण मार्गे पिंपरी-चिंचवड मधून मुंबई कडे मार्गस्थ होईल व  दि.२४ जानेवारी २०२१ रोजी मुंबई येथे पोहचेल असे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आली.