अन्यथा रस्तावर उतरण्याचा दिला इशारा
पुणे : बिडी कामगारांचे कायदे चालू ठेवणे व कल्याणकारी योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी सोनवणे हाॅस्पीटल, भवानी पेठ पुणे येथे अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने निर्देशने करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात बिडी कामगार उपस्थित होते. केंद्र सरकारने दोन महिन्यामध्ये देशभरातील बिडी कामगारांना दिलासा दिला नाही, तर सर्व बिडी कामगार रस्त्यावर उतरून देशव्यापी तीव्र आंदोलन करतील असा इशारा सरचिटणीस उमेश विस्वाद यांनी दिला आहे.
बिडी कामगारांच्या फायदेशीर तरतुदींचा नव्या कोड मध्ये समाविष्ट नसल्यामुळे उद्योजकांकडून कामगारांना मनमानी वागणूक व शोषण केले जाईल. तसेच भारत सरकारच्या GST करप्रणाली लागु केल्यामुळे बिडी वेलफेअर सेस कायदा रद्द केला म्हणून गेल्या ३ वर्षांपासून कल्याणकारी योजना बंद अवस्थेत आहेत.
बोर्डा तर्फे बिडी कल्याणकारी योजना हि इतर योजनांमध्ये वर्ग केल्याचं सांगितले जाते. पण एकाही बिडी कामगारांला शिष्यवृत्ती मिळालेली नाही. अशीच अवस्था घरकुल व आरोग्य सुविधांची आहे. या मुळे बिडी कामगारांचे जीवनमान खालावले आहे त्यामुळे कामगारांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना पुर्ववत सुरू राहाव्यात अशी मागणी संघटनेने केली आहे.
भारतातील १७ राज्यातून ८० लाख नोंदणीकृत बिडी कामगारांना कल्याणकारी सुविधा मिळाव्यात अन्यथा बिडी कामगारांना रस्तावर न्याय मागावा लागला असा इशारा संघटनेने दिला आहे.
या वेळी मागण्यांचे निवेदन डाॅ.एम लक्ष्मी यांनी स्विकारले तसेच वेलफेअर बोर्ड च्या मुख्य कार्यालय मार्फत केंद्रीय कामगार मंत्री यांना पाठविले जाईल असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात उमेश विस्वाद , अर्जुन चव्हाण, सचिन मेंगाळे, वासंती तुम्मा, विजया लक्ष्मी येमुल सहभागी होते.