महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ योजना झाल्या ठप्प

 

महाराष्ट्र राज्यात कार्यरत आस्थापना, कंपन्या, कारखाने, दुकाने, बँका, हॉस्पिटल्स, टूर्स आणि ट्रव्हल्स कंपन्या, विविध कंत्राटदार, ठेकेदार आदी सर्व वाणिज्य / व्यावसायिक संस्थांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे महाराष्ट्र कामगार कल्याण निधी भरणा करणे कायद्याने बंधनकारक आहे

        यानुसार प्रत्येक कामगारांच्या पगारामधून वर्षातून जून आणि डिसेंबरमध्ये खालीलप्रमाणे रु.१२/- अंशदान मंडळाकडे भरले जाते. 

       महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ Maharastra Labour Welfare Board (MLWB) विविध कामगार उपयोगी योजना, उपक्रम राबवित असते. यामध्ये जसे सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य, MS-CIT अर्थसहाय्य तसेच विविध उपक्रम राबविले जातात.

      परंतु सद्यपरिस्थिती मध्ये मागील ३ ते ४ महिन्यापासून मंडळाच्या कोणत्याही योजना व उपक्रम राबविले गेल्याचे दिसत नसून या योजना करिता फॉर्म ऑनलाईन भरायचे किंवा ऑफलाईन या बाबत देखील सुस्पष्टता नाही. यामुळे राज्यातील सर्व कामगारांना विविध योजना,उपक्रम यापासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.