कामाचे तास वाढणार कामगार वर्गावरती पडणार ताण

 


कामगार मंत्रालयाने (Ministry of labor) कामाच्या तासांमध्ये ( Working Hours) वाढ करुन १२ तास प्रतिदिवस करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या एका दिवसात ८ तासांपर्यंत काम करावे लागते. मंत्रालयाने ऑक्यूपेशनल सेफ्टी, हेल्थ एंड वर्किंग कंडीशन (OSH) संहिता २०२० च्या मसुदा नियमाअंतर्गत अधिकतम १२ तास काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
            
          OSH संहिताच्या मसूदा नियमांनुसार ज्यात आठवड्यातील कामाचे तास ४८ इतके राहतील. ओव्हरटाइममध्ये १५ ते ३० मिनिटांची वेळ ३० मिनिटांपर्यंत धरली जाईल. मसुद्यानुसार कोणताही व्यक्ती कमीत कमी अर्ध्या तासाच्या मध्यांतराशिवाय ५ तासांहून अधिक सतत काम करणार नाही. आठवड्यानुसार कामाचे तास अशा स्वरुपात आखले जातील. 

कामाच्या तासांमध्ये ( Working Hours) वाढ करुन १२ तास प्रतिदिवस झाल्यास जास्त वेळ केलेल्या कामाचा कामगारांना ओव्हरटाइम अलाउंस द्वारे अधिक पैसे मिळवण्याची संधीही मिळणार आहे.

परंतु याच बरोबर कामगारांवरती होणार परिणाम -
  • मूळ वेतन कमी राहण्याची शक्यता वाढणार
  • कामगार वर्गावरती कामाचा ताण व मानसिक ताण वाढणार
  • कुटुंबाला कमी वेळ देता येणार
  • १२ तास काम केल्यामुळे व्यवस्थापनास कामगार संख्या कमी लागणार त्यामुळे बेरोजगारी वाढणार