सारलोहा ॲडव्हान्सड मटेरियल प्रा. लिमि. (Saarloha Advanced Materials Private Ltd) येथे वेतनवाढ करार व आनंद मेळावा संपन्न

पुणे : सारलोहा ॲडव्हान्सड मटेरियल एम्प्लॉईज युनियन आणि कर्मचारी कल्याण निधी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कौटुंबिक आनंद मेळावा वानवडी पुणे येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कामगारांसाठी  वेतनवाढ सामंजस्य करार करण्यात आला. कंपनीच्या इतिहासात प्रथमच सर्व कुटुंबीयांसमोर  त्यांना बरोबर घेवून वेतन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

    युनियनच्या वतीने अध्यक्ष शशिकांत चव्हाण, सेक्रेटरी सिताराम सावंत, उपाध्यक्ष नितीन वीर, खजिनदार कैलास परदेशी, जनरल सेक्रेटरी माणिक चिंचकर, सदस्य शशिकांत जांभळे, अजय खांदवे यांनी स्वाक्षरी केल्या साक्षीदार म्हणून युनियन कडून माजी अध्यक्ष सुनील तांबे व संतोष जाधव तर व्यवस्थापनाकडून साक्षीदार म्हणून श्री प्रसाद मालुसरे व श्री सुरज ढमढेरे यांनी स्वाक्षरी केली.

    या करारवेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक डॉ.अजित ठाकूर, उध्दव जोशी तर वरिष्ठ अधिकारी श्री निखिल पचोरी, श्री शंकर शेळके,श्री विजय रायकोटी, चीफ फायनान्स ऑफिसर श्री आनंद परसरामका यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

    कामगारांच्या  हिताचा विचार करून अंदाजे रुपये 13500/- प्रति महिना आणि 40 महिन्यासाठी भरघोस वेतनवाढ करण्यात आली. कामगार प्रतिनिधिंनी  सहकार्य केल्याने उत्पादन वाढ आणि गुणवत्ता वाढीची अडचण दूर करण्यास मदत झाली, कामगारांनी कंपनीच्या हिताचे सुरक्षा, 5S , कैजेन प्रणाली संदर्भात अनेक उपक्रम राबविले त्यात चांगला प्रतिसाद मिळाला. सामंजस्य करार करताना 22 टक्के प्रोडक्शन वाढवून देताना  कामगारांनी सहकार्य केल्यामुळे व्यवस्थापनाने  इतर सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे कंपनीचे सामंजस्य अधिकारी ऍड.उद्धव जोशी यांनी सांगितले.

    औद्योगिक कायदा सेक्शन 2 पी / 18 सी एल अंतर्गत झालेल्या या करारामुळे भरघोस वाढ झाली आहे कामगार प्रतिनिधींनी स्वतंत्ररीत्या पुढाकार घेऊन स्टील मेल्टिंग शॉप मध्ये 15 टक्के मनुष्यबळ उत्पादकता वाढवून दिल्यामुळे बचत झाली आहे  तर कामगारांच्या हक्काच्या रजेमध्ये साठवणूक 120 वरून 90 पर्यंत कमी करण्यात आली. तसेच हजेरी बक्षीसामध्ये बाराशे रुपयांची वाढ करण्यात आली बिनव्याजी पगारापोटी चाळीस हजार रुपये आगाउ रक्कम देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्याचे मनुष्यबळ विभाग प्रमुख डॉ.अजित ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

    व्यवस्थापनाने केलेले सहकार्य त्याबद्दल आम्ही आभार मानतो, कामगार कमी करू नयेत अशी मागणी आपल्या मनोगत मध्ये कामगार युनियन अध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केली.

    कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांनी आपल्या मनोगत मध्ये बोलताना कामगार व कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या, 50 वर्षपूर्ती वाटचाल होत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत, 75 वर्षपूर्ती करण्यासाठी कामगारांनी साथ द्यावी, प्रदूषण कमी व्हावे, कोव्हीड झाल्यानंतर ऑर्डर कमी झाल्या, उत्पादन वाढविण्याबरोबर गुणवत्ता जपली पाहिजे कंपनी विकसीत झाली तर सर्व कामगारांचे कल्याण होईल. असे श्री श्रीनिवास यांनी सर्व कामगार व कुटुंबीय यांना उद्देशून सांगितले. 

    सहकार्यकारी अधिकारी श्रीनिवास, कंपनी आणि मनुष्यबळ व्यवस्थापक डॉ अजित ठाकूर, सी एफ ओ आनंद परसरांम का, यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.सूत्रसंचालन मनुष्यबळ विभाग प्रतिनिधी विद्या पठारे यांनी केले.

     सेक्रेटरी सीताराम सावंत यांनी वेतनवाढ करार केल्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले. या कार्यक्रमाला अनुसरून 20 आणि 30 वर्षे यशस्वी रित्या काम केलेल्या 60 कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापनाच्या वतीने मानचिन्ह, शाल, श्रीफळ,आणि 5500 रुपये देवून तर कुटुंबीयांना मनगटी घड्याळ देवून सन्मानित करण्यात आले. 

    त्यानंतर डॉ. संजीव सराफ यांचे सर्व कुटुंबीयांना औद्योगिक आणि घरेलु आजार आणि उपचार यावर व्याख्यान ठेवण्यात आले . कामगारांच्या मुलांना शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ अजित ठाकूर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अंदाजे 600 कुटुंबीयांनी एकत्र प्रितिभोजन आणि अलबेला ऑर्केस्त्राच्या सुमंधुर गाण्याचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील तांबे, रवींद्र चव्हाण प्रसाद मालुसरे यांनी परिश्रम घेतले. तर उपाध्यक्ष नितीन वीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.