मुंबई : दिनांक 27 मे 2022 रोजी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आवाहनावरुन संपूर्ण देशभर केंद्र व राज्य सरकारच्या श्रमिक कामगार आणि कर्मचारी हितविरोधी धोरणांविरुद्ध आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठिय्या धरणे आंदोलन सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि मुंबईत सर्व शासकीय कार्यालयासमोर करण्यात आले. मागण्यांचे निवेदन प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत सादर करण्यात आले अशी माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली आहे.
विशेषत: नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी,वेतनत्रुटींचे निवारण करावे आणि सर्व रिक्त पदे कायमस्वरूपी भरावीत यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे दौंड यांनी सांगितले आहे.
