रिलायन्स कंपनी करणार कोविड काळामध्ये कर्मचाऱ्यांना मोठी मदत

Reliance Industries Group has announced the Reliance Family Support and Welfare Scheme for its employees.

कोविडमुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी आणि वारसांसाठी रिलायन्सने मोठी घोषणा केली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी कंपनीनं काही कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स फॅमिली सपोर्ट अँड वेलफेअर स्कीम (Reliance Family Support and Welfare scheme) ची घोषणा केली आहे. 

रिलायन्स उद्योग समूहाच्या 'रिलायन्स फॅमिली सपोर्ट स्कीम' घोषणेनुसार,

  • कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पुढील पाच वर्षे कर्मचाऱ्याचा पगार मिळत राहील

  • पीडित परिवाराला एकरकमी रुपये १० लाखांची आर्थिक मदत दिली जाईल

  • कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च रिलायन्स इंडस्ट्रीजकडून केला जाईल

  • मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांना देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाल्यावर, त्या अभ्यासक्रमाचं शैक्षणिक शुल्क, वसतिगृह शुल्क आणि पाठ्यपुस्तकाचा खर्च यासाठी येणारा पूर्ण खर्च रिलायन्सकडून पुरवला जाईल.

  • मुलाचं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत, पती-पत्नी, आई-वडील मुलं यांचा सर्व प्रकारचा वैद्यकीय खर्च कंपनीकडून केला जाईल

  • सध्या जे कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी कोरोनाबाधित आहे, ते शारीरिक मानसिकदृष्ट्या ठीक होईपर्यंत कोविड-१९ रजा घेऊ शकतात

  • जे कर्मचारी रिलायन्स उद्योग समूहासाठी काम करतात, मात्र कंपनीच्या पे रोलवर नाहीत, त्यांचं कोरोनामुळे निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना एकरकमी दहा लाख रुपयांची मदत मिळेल.

  • रिलायन्स उद्योग समूहाच्या फॅमिली सपोर्ट स्कीममध्ये या सोबतच प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला कोरोना प्रतिबंधक लस रिलायन्स उद्योग समूहाकडून मिळणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये चेअरमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी म्हटलं की, 'करोना काळात प्रत्येकालाच कटू अनुभवाचा सामना करावा लागला. आपले सहकारी, नातेवाईक आणि प्रिय व्यक्तीच्या मृत्यूच्या धक्क्यातून आपण सावरत आहोत.'