नाशिक : ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन मध्ये उद्योगांना नव्याने निर्बंध सह कामकाज सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक उद्योगांमध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नसल्याची ओरड कामगारांमध्ये सुरू झाली आहे यामुळे आता उद्योगांकडून ही मार्गदर्शक तत्त्वे पाळली जातात की नाही हे तपासण्यासाठी एमआयडीसीकडून भरारी पथकाची स्थापना केली जाणार आहे.असे वृत्त देशदूत वृत्तसंस्थेने दिले आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत उद्योगांना सूट देण्यात आली आहे. मात्र काही निर्बंध लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश उद्योग सुरळीत सुरू असले तरी बहुतांश उद्योगांमध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमावलीची पायमल्ली होत असल्याने कामगार नेत्यांद्वारे तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक कारखान्यांतील कामगार नेते करोना संक्रमित झालेले आहेत.
उद्योगांकडून कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्याने तसेच कामगारांना घरापासून कंपनीपर्यंत तर कंपनीपासून घरापर्यंत जाण्यासाठी बसची सुविधादेखील उपलब्ध होत नसल्याने संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
- नितीन गवळी (प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी)