बिडी कामगारांना किमान वेतन लागू करावे

मुंबई : बिडी कामगारांना किमान वेतन लागू करावे अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले असता याबाबत पुढील कारवाई करण्यासाठी राजभवन सचिवालय यांनी प्रधान सचिव कामगार विभाग कडे पत्र पाठविले आहे.

     राज्यातील विविध शहरात सोलापूर, अहमदनगर, पुणे, भिवंडी, नाशिक. मुंबई उपनगर या ठिकाणी असणाऱ्या कारखान्यात सुमारे चार ते साडेचार लाख महिला कामगार काम करतात. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना तुटपुंज्या पगारात काम करायला लागत असल्याने या कामगारांना घर चालवणे देखील अवघड जाते. या मुळे बिडी कामगारांना राज्य शासनाच्या किमान वेतन मध्ये सामाविष्ट करावेत. अशी मागणी प्रदेक्षाध्यक्ष गणेश ताठे यांनी केली होती.