नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच दैनंदिन कामाच्या तासांसाठीची मर्यादा आठ तासांपर्यंत करेल, ज्यानंतर ओव्हरटाईम सुरू होईल. नवीन कामगार कायदा १२ तासांच्या कामाचा दिवस अशी परवानगी देतात हा गैरसमज संपविण्याच्या उद्देशाने तसेच नवीन कामगार संहिता अंतर्गत स्पष्टता यावी याकरिता निर्णय होईल अशी माहिती इकॉनॉमिक टाइम्सने दिली.
रोजच्या कामाचे तास आठ पर्यंत मर्यादित केल्यानंतर ओव्हरटाईम सुरू होईल, ओव्हरटाईम रक्कम कर्मचार्यांच्या नियमित पगाराच्या दुप्पट असावी हे देखील स्पष्ट केले जाणार आहे.