कंत्राटी पद्धतीवर कामगारांचे प्रचंड शोषण चालू - यशवंतभाऊ भोसले, छत्रपती संभाजी नगर येथे राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा कामगार मेळावा संपन्न

छत्रपती संभाजीनगर : कंत्राटी पद्धतीवर कामगारांचे प्रचंड शोषण सुरु असल्याने या पुढील  काळ हा श्रमिकांच्या व पुढील युवा पिढीसाठी खुपच हलाखीचा राहणार आहे, श्रमिक युवा पिढीसाठी हे मोठे आव्हान राहणार आहे, एकत्र येऊन संघटित होऊन श्रमिकाने, युवकांने त्यास प्रतिकार केला नाही, तर मूठभर भांडवलदार आणि नोकरशहा सरकारी अधिकारी वर्ग हा देशातील जनतेला ठेकेदारांच्या दावनीला बांधून गुलाम करतील. गेली 30 वर्षे आम्ही संघर्ष करूनही आमचे सरकार आणि आम्ही दोघेही हतबल आहोत अशी भूमिका राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष  यशवंतभाऊ भोसले यांनी छत्रपती संभाजी नगर येथील कामगार मेळाव्यात मांडली.

    जागतिकिकरणात पूर्वेकडील देशांनी मानवतेचा धर्म जपला व देशातील नोकरदार वर्गाची आरोग्याची त्याच्या राहणीमानाची, त्याचे परिवाराची काळजी घेऊन त्यांच्या मानवी हक्काला तडा न देता जागतिक व्यवसाय स्पर्धेत अग्रनी सहभाग ठेवला, आमच्याकडे मात्र हेच उलट झाले या स्पर्धेत पुढे येण्यासाठी भारतीय नागरिकांना यंत्राच्या जागी ठेवण्यात आले तेही कंत्राटी मद्दे असे चित्र आता तरी दिसत आहे,त्या मुळे त्याच्यातील माणूस संपला आहे, हे चित्र बदलावे लागणार असल्यानें संघटित व्हा आपले अधिकार मागून घ्या, संविधान हा आपला ग्रंथ आहे त्याचे जतन आपले केंद्रातील व राज्यातील सरकार करत आहे त्या बरोबर आपणासही ते जतन करावे लागणार आहे, त्यासाठी एक व्हा संघर्ष करा असे आवाहन भोसले यांनी या सभेत केले.

    श्री दत्तात्रय भालेराव सर यांनीही संघटित श्रमिक ही देशाची ताकद असून राष्ट्रीय श्रमिक आघाडी च्या पाठीशी खंबीर उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. अनेक कामगार संघटनेच्या प्रतिनिधिनी आपली तळमळ व व्यथा या वेळी मांडल्या.