भारतीय कामगारांची पहिली तुकडी इस्रायलमध्ये दाखल

तेल अविव - भारत आणि इस्रायल दरम्यान सरकार ते सरकार करारांतर्गत भारतातील ६० कामगारांची पहिली तुकडी आज इस्रायलमध्ये दाखल झाली. इस्रायलमधील बांधकाम उद्योगासमोरील कामगारांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी या कराराखाली भारतीय कामगारांना इस्रायलला पाठवण्यात आले आहे असे वृत्त प्रभात वृत्तसंस्थेने दिले आहे.

    अन्य देशातून बांधकाम मजूरांना नेण्यात असलेला मध्यस्थांचा अडथळा या करारातून हटवण्यात आला आहे. या बांधकाम मजूरांची निवड करण्यासाठी सरकारी पातळीवरून मजूरांची छाननी करण्यात आली आहे. या पर्यवेक्षकांनी भारतात येऊन मजूरांची निवड केली आहे. ही प्रक्रीया पार पाडल्यानंतर भारतीय मजूरांची पहिली तुकडी मंगळवारी संध्याकाळी इस्रायलमध्ये दाखल झाली.

    यापूर्वी काही महिन्यांपासून भारतातून सुमारे ९०० बांधकाम मजूर इस्रायलला पाठवण्यात आले होते. यामध्ये मनुष्यबळ कामगार पुरवणाऱ्या एजंटांचाही समावेश होता. इस्रायल-हमास दरम्यानचे युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलमधील बांधकाम उद्योगात कामगारांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी अन्य देशातून मजूर आणण्यात येऊ लागले आहेत.

    भारत आणि श्रीलंकेतील सुमारे २० हजार मजूरांना इस्रायलला नेण्यास इस्रायल सरकारने मान्यता दिली आहे. मात्र आताप्रयंत केवळ एक हजार मजूर इस्रायलमध्ये आल्याचे इस्रायल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने म्हटले आहे निवडलेल्या बहुतेक कामगारांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते आणि ते इस्रायलमध्ये काम करण्यासाठी व्हिसा मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जाते, असे ते म्हणाले.