पुणे : ईएसआयसीने (ESIC) ७ जून २०२१ रोजी पिरंगुट येथील एस्.व्ही.एस्.अॅक्वा टेक्नॉलाजीज् (SVS AquaTechnologies) येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचार्यांच्या अवलंबितांना निव्वळ लाभ म्हणून पेन्शन सुरू केली आहे.
पिरंगुट येथे आयोजित कार्यक्रमात ईएसआयसीचे पुणे विभाग प्रमुख (प्रभारी) हेमंतकुमार पांडे यांच्या हस्ते मृत कामगारांच्या अवलंबितांना पेन्शन देण्यात आली. एस्.व्ही.एस्.अॅक्वा टेक्नॉलाजीज् (SVS AquaTechnologies) कंपनीतील मृतांच्या आश्रित व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी ईएसआयसीचा पुढाकार आणि अवलंबितांच्या सोयी लक्षात घेऊन हा कार्यक्रम पिरंगुटमध्येच आयोजित करण्यात आला होता. श्री पांडे म्हणाले की, जखमी कामगारांना नियमानुसार लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल.
या दरम्यान पिरंगुट औद्योगिक क्षेत्रातील मालकांसाठी मार्गदर्शन शिबीरही आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये श्री पांडे यांनी ईएसआयसीने नुकत्याच राबविलेल्या कोविड-१९ मदत योजनेची माहिती दिली.
या योजनेंतर्गत कोविड-१९ मुळे आपला जीव गमावलेल्या नोंदणीकृत कामगारांच्या अवलंबितांना ईएसआयसीमार्फत पेन्शन देण्यात येईल. श्री पांडे यांनी सर्व उपस्थितांना या योजनेची माहिती जास्तीत जास्त कामगार व पीडित कुटुंबीयांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले जेणेकरून कोणत्याही पीडित कुटुंबास या योजनेद्वारे देण्यात येणाऱ्या लाभापासून वंचित रहावे लागणार नाही.
उपसंचालक श्री. सुशीलकुमार व सहाय्यक संचालक श्री चंदन प्रभाकर यांनी उपस्थित नियोक्ते व नियोक्ता प्रतिनिधींना अनुक्रमे ईएसआयसी कव्हरेज व विविध फायद्यांविषयी मार्गदर्शन केले.