आत्ता कर्मचाऱ्यांचा PF भरणार केंद्र सरकार

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचा (Atmanirbhar Bharat Rozgar Yojna) विस्तार

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्थेवरती परिणाम झाला असून या अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atmanirbhar Bharat Rozgar Yojna) ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच देशातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही सवलतीही देण्यात आल्या आहेत. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance minister Nirmala Sitaraman) यांनी काल (दि.२८ जून) ही माहिती दिली आहे.

या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंड (PF) म्हणजेच PF चा खर्च उचलणार आहे.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Aatma Nirbhar Bharat Rozgar Yojana) १ ऑक्टोबर,२०२० रोजी सुरू करण्यात आली. ही योजना  नियोक्तांना (Employer) नवीन रोजगार निर्मिती, ईपीएफओमार्फत रोजगारातील नुकसानाची पूर्ती करण्यास प्रोत्साहन देते. 

या योजनेंतर्गत एक हजार कर्मचार्‍यांच्या आस्थापना क्षमता साठी नियोक्ता (Employer) आणि कर्मचार्‍यांच्या (Employee’s) योगदानाचा हिस्सा  (एकूण २४%) आणि १,००० पेक्षा अधिक कर्मचारी असल्यास केवळ कर्मचार्‍यांचा (Employee’s) वाटा (वेतनाच्या १२%) मासिक १५,००० रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्या नवीन कर्मचार्‍यांच्या नोंदणीसाठी दोन वर्षांसाठी दिला जाईल. 

७९,५७७ आस्थापनांमधील २१.४२  लाख लाभार्थ्यांना १८ जून २०२१ पर्यंत ९०२ कोटी रुपयांचा लाभ दिला आहे. या योजनेंतर्गत सरकारने  नोंदणीची तारीख ३० जून २०२१ वरून ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.