मुंबई : राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे च्या सकाळी ७ पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
त्याअंतर्गत काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे.
उद्योग क्षेत्राकरिता महत्वाच्या सूचना खालील प्रमाणे :
A.खालील कारखाने चालू राहू शकतात आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कार्य करू शकतात.
- आवश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने आपल्या पूर्ण क्षमतेअनुसार चालू राहतील.
- निर्यात करण्यासाठीचे सामान बनविणारे कारखाने ज्यांना माल बाहेर पाठवायचा आहे.
- ज्या कारखान्यांमध्ये एकदम काम थांबवता येणार नाही आणि जास्त वेळ लावल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरू होऊ शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना ५०% क्षमते सह काम करता येईल.
B. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने यावर नजर ठेवावी व सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहे याची खात्री करावी.
C. कामगारांना राहण्याची व्यवस्था असणारे सर्व उद्योग किंवा युनिट मध्ये कामगार त्याच परिसरातील किंवा इतर ठिकाणच्या कारखान्यात काम करत असतील आणि तेथून वाहतूक सोयीस्कर आणि सुरक्षित असेल तर ये जा करता येईल. त्याचप्रमाणे व्यवस्थापन मधील दहा टक्के कर्मचारी अधिकाऱ्यांना बाहेरून येऊन काम करता येईल
ज्या स्टाफ मधील कर्मचाऱ्यांना बाहेरजाण्याची गरज नाही आशा कारखाने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करू शकतात.
व्यवस्थापन, कर्मचारी, प्रशासना मधील स्टाफच्या सगळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे लागतील.
जर हे कारखाने भारत सरकारच्या कार्यस्थळ लसीकरण अटीत बसत असतील,तर त्यांना लसीकरणाची व्यवस्था करावी लागेल.
D. कारखाने आणि उत्पादन करणारे युनिट यांना खालील शिस्त पाळाव्या लागतील :
- सर्व येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शरीराचा तापमान तपासून नियमांचे पालन करावे लागेल.जर एखादा कर्मचारी कामगार पॉझिटिव्हआढळला तर त्याच्यासोबत काम करणारे सगळे कर्मचारी व कामगारांना विलगीकरणात घेऊन त्यांना पगार द्यावा लागेल.
- ज्या कारखाना किंवा कंपनीत ५०० पेक्षा जास्त कामगार असतील, त्यांनी स्वतःचे क्वारंटाईन सुविधा उपलब्ध करावी. सदर केंद्रांमध्ये सर्व मूलभूत सुविधा असाव्यात आणि जर ही सुविधा कंपनीच्या परिसरात बाहेर असेल तर सर्व सुरक्षा उपाय करून पॉझिटिव्ह व्यक्तीला त्या केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल.
- जर एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळला तर पूर्ण कारखाना सॅनिटाईज करेपर्यंत काम बंद ठेवावे लागेल.
- गर्दी टाळण्याच्या उद्देशाने भोजन आणि चहाचे नियोजन करावे व सार्वजनिक जेवणासाठी कोणतीही जागा ठेवू नये.
- सार्वजनिक शौचालय यांना वारंवार सॅनिटाईज करावे.